राज्याच्या  कारागृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना यापुढे पोलिसांप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुविधा व वेतन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी केली. राज्यात लवकरच अठरा हजार पोलिसांची भरती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 पुण्यातील राज्य राखीव दलाच्या मैदानावर दहाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा स्पर्धाचा समारोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात कारागृह विभागाने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचे प्रशस्तीपत्र त्यांनी यावेळी दिले.