विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : पावसाचे बिघडलेले वेळापत्रक, उन्हाचा अभाव आणि गेले काही वर्षे पठाराला घातलेल्या सुरक्षा भिंतीमुळे फुलांचे बिघडलेले नैसर्गिक चक्र या साऱ्यांमुळे गेली काही वर्षे कासच्या पठारावर रुसलेली फुले यंदाही उमलण्याचे नाव घेत नाहीत. ऑगस्ट महिन्यात तरी ही फुले बहरण्याची शक्यता कमी असून, ती सप्टेंबरपासून काही प्रमाणात दिसू लागतील असा अंदाज आहे.

Uran, gale force winds, sea traffic, Mora to Mumbai, Karanja to Revas, JNPT to Bhaucha Dhakka, closed, precautionary measure, heavy rains, passenger traffic, tourist services, inconvenience, loksatta news,
वादळी वाऱ्यामुळे उरणची सागरी मार्गावरील जलसेवा खंडीत, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा
The gruesome murder of a baby in diapers dumped in bag in Bhopal
काळ्या पिशवीतून येणारी दुर्गंधी नि घोंघावणाऱ्या माशा; डायपर घातलेल्या चिमुरड्याची घृणास्पद हत्या
pregnant woman, jcb, Gadchiroli,
VIDEO : जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला, निकृष्ट रस्त्यांमुळे दुर्गम भामरागड तालुक्यातील नागरिकांचा जीव धोक्यात
heart-wrenching description of a hungry child's reaction to a poster showing a plate of food.
“भूक किती वाईट असते ना!” पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटाच्या पोस्टरला हात लावून चिमुकल्याने भरलं पोट, हृदयद्रावक Video Viral
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात
tree authority proposal for replantation of controversial trees on gangapur road
गंगापूर रोडवरील वादग्रस्त वृक्षांचे पुनर्रोपण? वृक्ष प्राधिकरणाचा प्रस्ताव
Yavatmal, accident, car hit truck,
यवतमाळ : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार जण ठार, एक गंभीर

फुले नसल्याने निराश झालेल्या पर्यटकांना सहलीचा खर्च आणि वाढीव प्रवेश शुल्काचाही मनस्ताप यंदा सोसावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाला, की जुलैपासून कास पठार फुलांनी बहरू लागते. मात्र गेले काही वर्षे पर्यटकांचा वाढता वावर आणि या पठाराला गेली अनेक वर्षे घातलेले कुंपण यामुळे या फुलांचा बहर कमी झाला आहे.  कुंपणाबाबत टीका झाल्यावर ते काढण्यात आले असले, तरी दरम्यानच्या काळात पठाराच्या नैसर्गिक स्थितीत मात्र खूप बदल घडलेले आहेत. येथील चराई बंद झाल्याने पठारावर मोठय़ा प्रमाणात तण माजले आहे. यामुळे गेली अनेक वर्षे फुलांचे प्रमाण हे कमी होत चालले आहे.

पठारावर फुलांचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. मात्र येथे पर्यटन सुलभ होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे. एक सप्टेंबरनंतर पठारावर फुलांचा बहर येईल, अशी आशा आहे. – दत्ता किर्दत,अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती