Mumbai Maharashtra Breaking News , 06 September 2023: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मनोज जरांगे अध्यादेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सराकर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.