सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरण उणे पाणीसाठ्यातून बाहेर पडले असून मंगळवारी पहाटे धरणातील पाणीसाठा चल स्वरूपात वाढण्यास सुरूवात झाली. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी मानल्या जाणा-या उजनी धरणातील पाणीसाठा उणे ३६ टक्क्यांपर्यंत खालावला होता. महिनाभरात २० टीएमसी एवढा पाणीसाठा वाढलेल्या या धरणात सध्या एकूण ६३.६९ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा >>> शरद पवारांच्या भूमिकेविषयी शंका? अशोक चव्हाण म्हणाले, “लोकांमध्ये संभ्रम…”

Business started from three thousand rupees Today earns more than 70 lakhs per month
Success Story: तीन हजार रुपयांपासून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला करतो ७० लाखांची कमाई
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Khadakwasla Dam, Releasing water Khadakwasla Dam,
पुणे : खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात
Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोने घसरणीनंतर किमतींमध्ये झाले मोठे बदल, पाहा मुंबई-पुण्यात काय सुरुये १० ग्रॅमचा भाव 
pain relief, dry needling, physiotherapy, exercise, lifestyle changes, neck pain, chronic pain, pain management, posture improvement, patient education,
Health Special: जो दुसऱ्यावरी विसंबला..
Do Bike Service At Right Time
Bike Service: किती दिवसांनी करावी बाईकची सर्व्हिसिंग? योग्य वेळ जाणून घ्या; पावसाळ्यात प्रवास होईल सुखाचा
Mumbai, Ganeshotsav Mandals, Mandap License, Government Decision,
मुंबई : जाचक अटींमुळे गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षे परवाना दूरच

एकूण १२३ टीएमसी इतक्या प्रचंड पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या उजनी धरणात गेल्या डिसेंबर्यंत शंभर टक्के पाणीसाठा होता. परंतु त्यानंतर नियोजनशून्य पाणी वाटपामुळे धरणात अल्पावधीतच तब्बल ६० टीएमसी पाणी फस्त झाले होते. त्यानंतर पुन्हा सुमारे २० टीएमसी पाणीसाठा रिता झाला होता.

हेही वाचा >>> “…याचा मक्ता त्यांना कोणी दिला?” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावलं

दरम्यान, भीमा खो-यात पडणा-या पावसामुळे उजनी धरणात पाणीसाठा संथगतीने का होईना, वाढत आहे. सध्या दौंडमार्गे १२ हजार २५५ क्युसेक विसर्गाने उजनी धरणात पाणी मिसळत आहे. तर पुण्यातील बंडगार्डन येथून दौंडच्या दिशेने ८४३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पहाटे पाचच्या सुमारास धरण उणेमधून उपयुक्त पाणी साठ्यात भरण्यास सुरूवात झाली. सकाळी धरणात उपयुक्त पाणीसाठा एक टक्का (अर्धा टीएमसी) होता. गतवर्षी १२ जुलै रोजी धरणात चल पाणीसाठा भराण्यास सुरूवात झाली होती.  यंदाच्या वर्षी चल पाणीसाठा जमा होण्यास १९ दिवसांचा विलंब लागला.