आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील पक्ष मोर्चेबांधणी करू लागले आहेत. काँग्रेसनेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाला सत्तेपासून बाजूला करायचं हा एकमेव उद्देश असल्याचं काँग्रेस नेते सांगत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या बैठका वाढल्या आहेत. भाजपाविरोधात तिन्ही पक्षांनी वज्रमूठ तयार केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष त्यांच्या मित्र पक्षांसह एकत्र लढतील अशी चिन्हं दिसत आहेत. तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील प्रत्येकी तीन-तीन प्रमुख नेत्यांची समिती तयार केली आहे. ही समिती आगामी काळात जागावाटपावर निर्णय घेईल.

Praniti Shinde First Speech in Loksabha on Maratha Reservation
प्रणिती शिंदे यांचं लोकसभेत पहिलंच भाषण; मराठा आरक्षणावरून राज्य आणि केंद्रावर केली टीका, म्हणाल्या…
Indian Constitution, legislation, state cabinet, higher education department, Chandrakant Patil, unconstitutional abuse, Supreme Court, University Grants Commission, permanent positions, contract teachers, backward classes, Article 254, M.Phil, assured progression scheme, BT Deshmukh, Eknath Shinde, loksatta news
‘त्या’ अधिकाऱ्यांच्‍या घटनाबाह्य कारभाराकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष, माजी आमदार बी.टी. देशमुख म्हणतात,’पोरकटपणाचा हट्ट…’
upsc president resign congress criticized
यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “संविधानिक संस्थांना…”
bjp eyes on Maharashtra Assembly Speaker post
विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा; तिन्ही पक्षांचा पदावर दावा
rahul gandhi letter to yogi adityanath
हाथरस दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने…”
Congress state president Nana Patoles criticize Narendra Modi
मोदी हे भ्रष्ट लोकांचे सरदार… ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’… पटोलेंची कठोर टीका
rohit pawar on paper leak issue
पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार का? रोहित पवारांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचे थेट उत्तर; म्हणाले…
Devendra Fadnavis and bhaskar jadhav
भास्कर जाधवांनी सभागृहात वाचून दाखवला व्हॉट्सअप मेसेज; फेक नरेटिव्हचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी आता…”

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे दोन पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढतील असं बोललं जात आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. काँग्रेच्या काही नेत्यांनी मुंबई महापालिकेबाबत स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांना याबद्दल पुन्हा एकदा विचारण्यात आलं.

हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र

काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. यावर पटोले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आम्ही आधीच सांगितलं आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समितीची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा नगरपालिकेची, जिथे जिथे जशी परिस्थिती असेल, तिथल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.