भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी लोकांसाठी काशी-सारनाथ यात्रेचं आयोजन केलं आहे. यावरून पत्रकारांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली. यावर पटोले म्हणाले की, “भाजपा हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट आहे. पण आता कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. लोक भाजपासोबत जाणार नाहीत.”

पटोले म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीद्वारे लोकांचा कल समजला आहे. आपण नुकतंच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पाहीलं की, महविकास आघाडीची पंचसूत्री होती. त्याचं त्यांनी पंचामृत केलं. अमृत देत असताना त्यात विष कालवून देण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्यामुळे आता त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी काही होणार नाही. त्याचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. येणाऱ्या काळात जनता भाजपाला सत्तेच्या बाहेर काढेल.

Wardha Zilla Parishad, Livestock Development Officer,
वर्धा : निलंबन रद्द! शासनास झाली उपरती अन…
man threatened girlfriend to attack with acid for withdraw rape complaint
तोंडावर ॲसिड फेकून तुझे आयुष्यच खराब करतो….बलात्कार पीडितेला रस्त्यात गाठून….
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
Petition, Rahul Gandhi,
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत यांच्या विरोधात याचिका; मतदान यंत्राबाबत खोट्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा दावा
navi mumbai, gold, lure,
नवी मुंबई : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून बोलावले आणि पोलीस असल्याची बतावणी करून १३ लाखांचा दरोडा टाकला 
kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
Highly educated youth arrested for murdering his wife due to suspicion of character and filing a false complaint pune print news
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून खोटी तक्रार देणारा उच्चशिक्षित तरुण गजाआड; शिरूरमधील रांजणगाव सांडसमधील घटना
Sharad Pawar VS Ajit Pawar
“अधून-मधून वारीला जाणाऱ्यांना हौशे-नवशे-गवसे म्हणतात”, रशियातील महिलेचा किस्सा सांगत शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला!

हे ही वाचा >> “राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या!” भाजपा नेत्याची मागणी, जमीनही सुचवली

“केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत” : पटोले

दरम्यान, H3N2 Influenza हा आजार सर्वत्र पसरू लागला आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पटोले म्हणाले की, सगळे आजार हे विदेशातून आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने काही सल्ले दिले ते केंद्र सरकारने ऐकले नाहीत. त्यांनी सांगितलेले निर्बंध भारताने लावले नाहीत. देशाच्या सीमा सील करण्यास सांगितलं, ते केलं नाही. उलट नमस्ते ट्रम्प करत देशात कोरोनासारखा आजार आणला. यामुळे देशाची मोठी हानी झाली. अशा प्रकारचे विदेशी आजार देशात पसरत असताना त्याला प्रतिबंध करण्याऐवजी केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत आहे. त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.