मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत हा निर्णय घ्यावा, असंही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं. न्यायालयाने ११ मे २०२३ रोजी हा निर्णय दिला होता. हा निर्णय देऊन आता सात महिने उलटली आहेत, तरीही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष मुद्दाम विलंब करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांचे दिल्ली दौरेही वाढले आहेत. दिल्लीत जाऊन ते महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत मार्गदर्शन घेतात. भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या सल्ल्यानुसारच वागतात, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
eknath shinde and popat dhotre friendship news
‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

हेही वाचा- “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेतला तर शिंदे गट अडचणीत येईल, असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. तसेच नार्वेकर सातत्याने दिल्लीत जाऊन चर्चा करतात आणि मार्गदर्शन घेतात, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांना आवडणारी नाही, कारण महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, असं रोहित पवार म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंबरोबर कधीपर्यंत राहणार? बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “मला एवढीच अपेक्षा आहे की, राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय संविधानाच्या बाजूने घ्यावा. नार्वेकरांनी हा निर्णय घेण्यास बराच उशीर केला आहे. त्यामुळे मला त्यांना फक्त एकच विनंती करायची आहे. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष सातत्याने दिल्लीला जाऊन चर्चा करत असतील आणि मार्गदर्शन घेत असतील, तर हे राज्यातील नागरिकांना आवडणारं नाही. ते लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेणार असतील तर शिंदे गट अडचणीत येईल, असं मला वाटतं.”

Story img Loader