सोलापूर : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचे आकडे खाली आल्यामुळे सर्व काही ठीक नाही, अशा अपयशाचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे विकासाचे मुद्दे सोडून द्वेषाचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सोलापुरात लोकसभेच्या प्रचारासाठी आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी, देशात भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, २०१४ पूर्वी देशात भाजपला २०-२२ टक्क्यांवार मते मिळत नव्हती. २०१४ साली त्यांना ३१ टक्के मिळाली होती. नंतर २०१९ साली पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपला ३७ टक्के मते मिळाली होती. आता ती ३० टक्क्यांपर्यंत दिसतात. विरोधकांच्या मतांमध्ये म्हणजेच भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी होत गेल्यामुळे भाजापला सत्ता मिळत गेली. परंतु आता ही मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
mira Bhayandar , BJP, Narendra Mehta, assembly elections, Mira Road, internal disputes, Gita Jain, Ravi Vyas, election candidacy, former MLA, BJP workers, mira bhayandar news,
नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता
rajya sabha bjp candidate dhairyasheel patil
रायगडच्या पाटलांमुळे स्मृती इराणींची संधी हुकली
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
Supriya Sule criticizes Ajit Pawar over Chief Minister Ladki Bahin Yojana
कोणतीच बहीण लाडकी नसल्याचा अधिक अनुभव! सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार लक्ष्य
number of polling stations will increase One polling station for every thousand-twelve hundred voters
मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार; हजार-बाराशे मतदारांमागे एक मतदान केंद्र
Loksatta chawadi Ajitdada Pawar Lok Sabha Elections nationalist janayatra  of pilgrimage
चावडी: अजितदादांची तलवार म्यानच

हेही वाचा – “..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

हेही वाचा – धाराशिव : वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती, कोणाला होणार लाभ, कोणाची गुल होणार बत्ती?

वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीबरोबर घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला. परंतु ‘वंचित’कडून स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेस न येता दुय्यम फळीतील नेत्यांना पाठविले गेले आणि या दुय्यम फळीतील नेत्यांची भाषा अपमानास्पद होती. जागा वाटपात त्यांच्या अव्यवाहार्य मागण्या मान्य करणे शक्य नव्हते. मागील २०१९ साली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र असताना त्यांना ७ टक्के मते मिळाली होती. त्यातून सोलापूरसह सात लोकसभा जागांवर भाजपविरोधी मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला होता. परंतु आता त्यांच्यासोबत एमआयएम नाही. त्यामुळे ‘वंचित’च्या मतांचा टक्का तीनपर्यंत खाली येऊ शकतो, असे भाकितही चव्हाण यांनी वर्तविले.