उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची अवस्था विझत आलेल्या दिव्यासारखी झाली आहे. त्यामुळेच हे दोघंही वाट्टेल ते बोलत आहेत. उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे म्हणजे सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे विश्वासू रामदास कदम यांनी केली आहे. भ्रष्टाचारी कोण आहे हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह काम करण्याची संधी मला मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण आत्ता जे महाराष्ट्रात बाप-बेटे दोघेजण बडबड करत आहेत. उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू, यांचं बोलणं, वागणं आणि टोमणे हे पाहिले तर एखादा दिवा विझताना जसा फडफडतो तशी फडफड या दोघांची सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांचं कलम ३७० हटवण्याचं आणि राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं. तरीही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातच बोलण्याचं काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहेत.”

Pradeep Agrawal BJP islam
“…तर मुसलमान होईन”, भाजपा नेत्याची फेसबुकवर ज्येष्ठ नेत्यांना धमकी
Excluding controversial BJP leader Nitesh Rane from the list of spokespersons
नुकसानीच्या भीतीने भाजपची नितेश राणेंना चपराक?
Mav leaders bjp Campaigning convention ajit pawar mahayuti
मविआ नेते लक्ष्य; भाजप अधिवेशनात प्रचाराची दिशा स्पष्ट, ‘संभ्रमा’तील कार्यकर्त्यांना संदेश
mp women burried
रस्त्याच्या बांधकामाला विरोध केल्याने दोन महिलांना मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना!
dharmarao baba atram
तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…
Last year, a video clip emerged which showed Tibetan spiritual leader Dalai Lama purportedly kissing a boy on his lips and it sparked outrage.
दलाई लामांनी लहान मुलाला किस केल्याचं प्रकरण, POCSO अंतर्गत कारवाईची मागणी न्यायालयाने फेटाळली
Crime News
१५ वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचं रहस्य निनावी पत्रामुळे उलगडलं, कुठे घडली घटना?
Controversy, Shukre commission,
शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद

उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

“अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी महाराष्ट्राचा नालायक मुख्यमंत्री कोण ठरलं असेल तर हा माणूस. (उद्धव ठाकरे) ४० पैकी एकाही आमदाराने ५० खोके घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन असं आव्हानच मी करतो आहे. आम्हाला फक्त बदनाम करण्यासाठी हे केलं जातं आहे. आपल्याकडून मुख्यमंत्रिपद का गेलं? पद का सोडावं लागलं? ४० आमदार, १० अपक्ष आमदार १३ खासदार हे सगळे का निघून गेले याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी ज्या ज्या नेत्यांना घडवलं त्यांना संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.” असाही आरोप रामदास कदम यांनी केला.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस नाही तर ‘फोडणवीस’, हे घरफोडे आता..”; उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी

उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे

“आम्ही पुष्कळ मिठाईचे खोके दिले होते. मात्र तिथे धबधबा सुरु रहावा लागतो. पुढच्या दहा दिवसांत उद्धव ठाकरेंबरोबर असलेले आमदार एकनाथ शिंदेंना साथ देतील. उद्धव ठाकरेंना फक्त टोमणे मारता येतात. मी एकनाथ शिंदेंकडे मागणी केली आहे की उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळणार आहे की भ्रष्टाचारी कोण आहे. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत आणि त्याच अनुषंगाने काम करत आहोत” असंही रामदास कदम म्हणाले आहेत.