या देशामध्ये न्याययंत्रणा सर्वोच्च आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अभिनेता संजय दत्त याने शिक्षा भोगली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. न्यायालयाने संजय दत्त याला शिक्षेतून सवलत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकडे लक्ष वेधले असता अण्णा हजारे म्हणाले, आपल्या देशामध्ये न्याययंत्रणा सर्वोच्च आहे. त्यामुळे एकदा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याविषयी कोणी भाष्य करू नये.