गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याप्रकरणी मालेगाव न्यायालयात मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानाची दावा दाखल केला होता. याप्रकरणाच्या सुनावणीला संजय राऊत यांनी आज ( २ डिसेंबर ) न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीनंतर संजय राऊतांनी दादा भुसेंवर हल्लाबोल केला आहे. संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिला आहे, असं म्हणत राऊतांनी भुसेंवर टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रूपये गोळा केले. हे पैसे शेतकऱ्यांचे असून, त्याच्या पावत्याही आहेत. याचा हिशोब मागितला, तर आम्ही गुन्हेगार झालो का?”

Kanagana Ranaut in Trouble
कंगना रणौत यांची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान, न्यायमूर्तींनी नोटीसही पाठवली!
Vijay Wadettiwar warning to the Grand Alliance regarding Manoj Jarange Mumbai
उगाच विरोधकांवर खापर फोडू नका; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला इशारा
Jayant Patil On Ajit Pawar
“मोदी सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “राज्यातल्या खासदारांनी…”
case registered against 22 including sharad pawar group mla jitendra awad at mumbra police station
आमदार जितेंद्र आव्हाडांसह २२ जणांवर गुन्हे दाखल; खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा तक्रारदारीत आरोप
priests and servants working in religious places should undergo character verification says neelam gorhe
पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
NCP mla disqualification case -Sharad Pawar
“लवकरच न्याय मिळणार”, पक्षफुटीच्या प्रकरणावरील सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ टिप्पणीमुळे शरद पवार गटाच्या आशा पल्लवित
Sanjay Raut on Ambadas Danve
“भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने…”, विधानपरिषदेतल्या राड्यानंतर संजय राऊतांकडून अंबादास दानवेंची पाठराखण
Chinchwad Assembly by-election,
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील वाद आता चिघळला; एकाची हत्या, भाजपचा ‘हा’ पदाधिकारी ताब्यात

“काहीजण नोटीस आल्यानंतर दुसऱ्या पक्षात पळून गेले”

“संविधानाने चोराला चोर म्हणण्याचा आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा मला अधिकार दिला आहे. संविधान, नियम मलाही माहिती आहेत. खटला दाखल केल्याने न्यायालयात आलो. आम्ही काय घाबरतो का? काहीजण नोटीस आल्यानंतर दुसऱ्या पक्षात पळून गेले. मालेगावचा लढवय्या योद्धा अद्वय हिरे तुरूंगात आहेत. अद्वय हिरेच मालेगावचे आमदार होतील,” असा विश्वास व्यक्त करत राऊतांनी भुसेंवर टीकास्र डागलं.

“…तर माफी कशाला मागायची”

न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला का? या प्रश्नावर संजय राऊतांनी म्हटलं, “मी आयुष्यात कुणाचीही माफी मागितली नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. सत्य असेल, तर माफी कशाला मागायची. आम्ही खोट्या भूमिका मांडत नाही. शेतकऱ्यांचा पैसा असून पुरावे आहेत. मग, माफी कुणाची मागायची? दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी.”

“२०२४ नंतर सर्व यंत्रणा सुमोटो तक्रार दाखल करून घेतील”

आपण केलेल्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “२०२४ नंतर ईडी, सीबीआय, पोलीस सुमोटो तक्रार दाखल करून घेतील. आम्हाला जायचीही गरज पडणार नाही.”