ज्येष्ठ हिंदी कवी हरिनारायण व्यास (वय ९०) यांचे पुण्यात सोमवारी अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे व दोन मुली आहेत.
हिंदी भाषेतील ते एक महत्त्वाचे कवी समजले जात. त्यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘मृग और तृष्णा’, ‘त्रिकोणपर सूर्योदय’, ‘बरगद के चिकने पत्ते’, ‘आऊटर पर रूकी ट्रेन’, ‘निद्रा के अनंत मे जागते हुए’ या त्यांच्या कवितासंग्रहांना रसिकांचा विशेष प्रतिसाद लाभला.
व्यास उज्जनच्या प्रेमचंद सृजन पीठाचे निर्देशक होते. भोपाळमधील भारत भवनाच्या ‘वागार्थ’ या उपक्रमाचे ते संयोजक होते. मध्य प्रदेश साहित्य संघाचे ‘भवभूती पारितोषिक’, ‘शिखर पारितोषिक’ तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या ‘अनंत गोपाल शेवडे पारितोषिका’चे ते मानकरी होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ हिंदी कवी हरिनारायण व्यास यांचे निधन
ज्येष्ठ हिंदी कवी हरिनारायण व्यास (वय ९०) यांचे पुण्यात सोमवारी अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे व दोन मुली आहेत. हिंदी भाषेतील ते एक महत्त्वाचे कवी समजले जात. त्यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘मृग और तृष्णा’, ‘त्रिकोणपर सूर्योदय’, ‘बरगद के चिकने पत्ते’, ‘आऊटर पर रूकी ट्रेन’, ‘निद्रा के अनंत मे जागते हुए’ या त्यांच्या कवितासंग्रहांना रसिकांचा विशेष प्रतिसाद लाभला.
First published on: 15-01-2013 at 03:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior hindi poet writer harinarayan vyas passed away