महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. तसंच, लोकसभा निवडणूक मनसे लढवणार असल्याचं जाहीर झाल्यापासून शर्मिला ठाकरे अनेकाविध राजकीय भाषणेही करत आहेत. या भाषणांतून त्या सातत्याने सत्ताधारी युती आणि महाविकास आघाडीवर तोफ डागत आहेत. काल (५ फेब्रुवारी) पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी कोविड काळात सत्ताधारी पक्ष बंगल्यात बसून होते, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पुण्यातील कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मार्च- एप्रिल महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील. मग ऑक्टोबरमध्ये आमदारकीच्या निवडणुका. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका लागतील. पण तरीही आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात.”

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान

“कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी काम केलं तेवढी कामं कोणत्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा सगळे सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. आपला पक्ष रस्त्यावर होता. आपली चांगली चांगली पोरं कोविडमध्ये दगावली. तरीही मी अभिमानाने सांगेन की आमचा पक्ष एवढी चांगली कामं करतोय तर तुमचा कृपाशिर्वाद असाच राहुदे”, असंही आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

“आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार होते, आपण एवढी कामं केली, पण लोकांनी (मतदानावेळी) चूक केली. पण यावेळी लोक चूक करणार नाहीत. तुमच्या फोनवर उपलब्ध असलेले चांगले उमेदवार आहेत. हे उमेदवार तुमची कामं पटापट करतात. त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवा. त्यांना नक्कीच मला वरच्या स्तरावर बघायचं आहे”, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.