अजित पवार गटाचे नेते आणि अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं. त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळांच्या या भूमिकेनंतर मराठा समाजातून त्यांना प्रचंड विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, गुरुवारी (३० नोव्हेंबर) छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना मराठा समुदायाकडून त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. मराठा आरक्षण समर्थकांनी भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा देण्यात आला. या संपूर्ण घडामोडींवर प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळांचं नेतृत्व अतिशय चांगलं आणि दमदार आहे. ते भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात, असं सूचक वक्तव्य आमदार कडू यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
Praniti Shinde First Speech in Loksabha on Maratha Reservation
प्रणिती शिंदे यांचं लोकसभेत पहिलंच भाषण; मराठा आरक्षणावरून राज्य आणि केंद्रावर केली टीका, म्हणाल्या…
Raola government central unstable Criticism of Mamata Banerjee
केंद्रातील राओला सरकार अस्थिर; ममता बॅनर्जीं यांची टीका
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
Agitation of the Sangharsh Samiti till cancellation of the contract regarding smart prepaid meters
स्मार्ट प्रीपेड मीटर: कंत्राट रद्द होईपर्यंत आंदोलन.. नागरिक संघर्ष समिती म्हणते…
anupriya patel on bjp
राम मंदिर आणि मोदींवर भाजपाचा अतिविश्वास होता का? केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल काय म्हणाल्या?
Ganesh Naik, eknath shinde,
अस्वस्थ गणेश नाईकांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Loksatta editorial High Court granted bail to former Jharkhand Chief Minister Hemant Sorenm
अग्रलेख: नियम आणि नियत!

हेही वाचा- “२००४ ला भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी…”, वाजपेयी-महाजनांचा दाखला देत प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

येवल्यात छगन भुजबळांना झालेल्या विरोधाबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “छगन भुजबळांचं नेतृत्व अतिशय चांगलं आणि दमदार आहे. फक्त त्यांचा पवित्रा थोडासा चुकला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचं आणि मराठ्यांसह ओबीसींचं, एससी, एसटींचं नेतृत्व करावं. मराठा आणि ओबीसी हे खानदानी शत्रू नाहीयेत. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर ते दमदार नेतृत्व आहे. अतिशय मजबूत नेतृत्व आहे. त्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली तर ते भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात.”