scorecardresearch

उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारल्याने सोलापूरकर सुखावले 

उजनी धरणाची एकूण क्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी ४० टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे.

water level increased rapidly in ujani dam in last three days
उजनी धरण

सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात तीन महिने पावसाने हुलकावणीच दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असताना जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातही पाणीसाठा जेमतेम असल्यामुळे सार्वत्रिक चिंता व्यक्त होत असतानाच सुदैवाने धरणाच्या वरील भागात होणा-या जोमदार पावसामुळे धरण वेगाने भरत आहे. त्यामुळे सोलापूरकर सुखावले आहेत.

मागील १५ दिवसांत उजनी धरणातील पाणीसाठा वधारत असून अवघ्या २० टक्क्यांच्या पुढे न वाढणारा धरणातील पाणीसाठा आता वेगाने वाढत ४० टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रविवारी सायंकाळी धरणात एकूण पाणीसाठा ८४.२३ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २०.५१ पर्यंत वाढला होता. गेल्या तीन दिवसांत पाणीसाठा झपाट्याने वाढला असून येत्या दोन दिवसांत उपयुक्त पाणीसाठा ५० टक्के सर करण्याची आशा निर्माण झाली आहे.

water discharge from Chandoli
सांगली : चांदोलीतून विसर्ग वाढवला, सतर्कतेचा इशारा
ganesh visarjan karjat
VIDEO: कर्जतमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले चारजण उल्हास नदीत बुडाले, एकाला वाचवण्यात यश
Jejuri Gad
जेजुरीच्या खंडोबा गडाला प्राप्त होणार ऐतिहासिक वैभव, विकास आराखड्यातून दुरुस्तीचे काम वेगात
pola celebration
बैल पोळ्यावर महागाईची ‘झूल’; ‘सर्जा-राजा’चा साजश्रुंगार महागला; जाणून घ्या बाजारातील स्थिती

हेही वाचा >>> सातारा : किसन वीर कारखान्याला मदत होत नाही, तोपर्यंत शपथ नाही – मकरंद पाटील

उजनी धरणाची एकूण क्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी ४० टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. प्राप्त परिस्थितीत धरणातील वाढलेला पाणीसाठा पाहता धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी दुपारी उजनी धरणात दौंडमार्गे येणारा पाण्याचा विसर्ग २५ हजार ८५९ क्युसेक इतका होता. त्यात सायंकाळी नऊ हजार क्युसेकने वाढ होऊन ३४ हजार १५८ क्युसेक विसर्गाने पाणी धरणात मिसळत होते. पुण्यातील बंडगार्डन येथून नदीत येणा-या पाण्याचा विसर्ग वाढून १६ हजार १२३ क्युसेकपर्यंत गेल्यामुळे उद्या सोमवारी धरणात मिसळणारे पाणी सुमारे ४० हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> सातारा : वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा – शिवेंद्रसिंहराजे

या धरणावर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी अवलंबून आहे. परंतु यंदा पावसाळा सरत आला तरी धरणात पाणीसाठ्याची स्थिती दयनीय असल्यामुळे शेती संकटात आली होती. यातच सोलापूर शहरासह पंढरपूर व सांगोला शरासाठी धरणातून सुमारे पाच टीएमसी पाणी भीमा नदीवाटे सोडण्यात आल्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी खालावला होता. धरण किमान ३३ टक्के भरले तरच पाण्याचे आवर्तन सोडता येते. सुदैवाने धरणात पाणीसाठा वाढू लागल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे उजनी धरणातील अल्पसा शिल्लक असलेला पाणीसाठा विचारात घेता सोलापूरसाठी पिण्याकरिता शेजारच्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाणी मिळविण्याचे सुरू असलेले प्रयत्नही आता करावे लागणार नाहीत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water level increased rapidly in ujani dam in last three days zws

First published on: 01-10-2023 at 21:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×