नाटक, बालनाट्य, गुढकथा, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे रत्नाकर मतकरी पुन्हा एकदा रंगमंचावर त्यांचं गाजलेलं ‘आरण्यक’ हे नाटक घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हे नाटक ४४ वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४४ वर्षापूर्वी रंगमंचावर आलेलं ‘आरण्यक’ हे रत्नाकर मतकरी यांचे पद्यबंधातले पौराणिक नाटक असून याची कथा महाभारतातील आहे. भारतीय युध्दानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर वनात जातात, ती ही कहाणी. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना या नाटकाचा अनुभव घेता येणार असून या नाटकात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 44 years later aranyak marathi drama
First published on: 24-09-2018 at 15:25 IST