‘जाने भी दो यारो’, ‘मंडी’पासून ते अगदी अलीकडच्या ‘मुल्क’, ‘बधाई हो’सारख्या चित्रपटांतील सशक्त भूमिकांसाठी चर्चेतलं नाव म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. वर्षभरापूर्वी या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीने सोशल मीडियावर कामाच्या शोधात असल्याची पोस्ट लिहिली होती. ‘बधाई हो’नंतर ‘शुरुवात का ट्विस्ट’ या लघुपटात त्या झळकणार आहेत. यासोबतच कंगना रणौतचा ‘पंगा’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ असे चित्रपट त्यांच्या हातात आहेत. यानिमित्त नीना गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद..

बॉलिवूडमधील घराणेशाही, सोशल मीडियावरील ट्रोलिंग यांसारख्या विविध मुद्द्यांवर नीना गुप्ता यांनी त्यांची मतं मोकळेपणाने मांडली.