भिन्न विचारांचे, भिन्न राहणीमान असलेले दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री भन्नाट जमते असं म्हटलं जातं. कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांची त्यांच्या रिअल लाइफपार्टनर सोबत अशीच मस्त केमिस्ट्री जमते. त्यामुळे अनेक कलाकारांच्या लव्हस्टोरीही चाहत्यांना माहित आहे. परंतु दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात स्टायलिस्ट अभिनेता अल्लू अर्जुन याची लव्हस्टोरी थोडी हटके आहे. अगदी एखाद्या चित्रपटाला साजेशी त्याची लव्हस्टोरी असून आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊयात. दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनकडे पाहिलं जातं. त्याची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. मात्र अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता मात्र एका लग्नात एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशीच त्याने लग्नगाठ बांधली. अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी फार कमी जणांना माहित असेल. अल्लू अर्जुनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी असून त्यांनी दोन मुलंदेखील आहेत. एका मित्राच्या लग्नात अल्लू अर्जुन आणि स्नेहाची पहिली भेट झाली. खरंतर पहिल्या भेटीतच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अल्लूने जेव्हा पहिल्यांदा स्नेहाला पाहिलं तेव्हा तिने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केलं. तिचं हे हास्य पाहूनच तो त्याक्षणी तिच्या प्रेमात पडला. विशेष म्हणजे याच लग्नात त्यांनी एकमेकांचे फोन एक्सचेंज केले. त्यानंतर त्याचं फोनवर बोलणं वाढलं. View this post on Instagram 7 Yrs of Marriage #alluarjun #allusnehareddy A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on Mar 5, 2018 at 8:48am PST त्यावेळी स्नेहा नुकतीच अमेरिकेमधून तिची मास्टर्सची डिग्री पूर्ण करुन भारतात परतली होती. स्नेहा हैदराबादमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी होती. तर अल्लू अर्जुनदेखील त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याने तेलुगु कलाविश्वात स्वत:च स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे स्नेहा त्याला एक सुपरस्टार म्हणूनच ओळखत होती. विशेष म्हणजे अल्लू आणि स्नेहा नात्याला घरातल्यांचा पाठिंबा नव्हता. अल्लूने त्याच्या वडिलांना अनेक मिन्नतवाऱ्या केल्यानंतर ते स्नेहाच्या घरी अल्लूसाठी लग्नाची मागणी घालायला गेले मात्र स्नेहाच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला. परंतु अनेक प्रयत्न, विनवण्या करुन या दोघांनीही घरातल्यांना लग्नासाठी तयार केलं. त्यानंतर ६ मार्च २०११ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. दरम्यान, अल्लू अर्जुन आणि स्नेहाला अयान आणि अरहा ही दोन मुलं आहेत. अल्लू दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसंच समाजकार्यातही को पुढे असतो. सध्या देशात सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये त्याने १.२५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.