बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. यामध्ये सर्वाधिक टीका होतेय ती अभिनेत्री आलिया भट्टवर. दरम्यान अभिनेता कमाल आर. खान याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. देशातील ७५ टक्के लोकांना यापुढे तिचे चित्रपट पाहायचे नाहीत, असा दावा त्याने केला आहे. Result- 32000 ppl voted. 75% people don’t want to watch #AliaBhatt films. 25% ppl still want to watch her film. But out of 25% these ppl, 15% people are from Gulf, Pakistan and Bangladesh. Means only 10% Indian people want to watch her film. So her next film can become disaster. — KRK (@kamaalrkhan) June 20, 2020 कमाल खान उर्फ केआरके याने काही दिवसांपूर्वी एक पोल केला होता. "यापुढे आलिया भट्टचे चित्रपट तुम्ही पाहाल का?" असा प्रश्न त्याने विचारला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ७५ टक्के लोकांनी यावर 'नाही' असं उत्तर दिलं. या पोलच्या आधारावर केआरकेने भारतातील केवळ १० टक्के लोक आलियाचे चित्रपट पाहतील असा दावा केला आहे. Will you still watch Alia Bhatt films? क्या अभी भी आप आलिया भट की फ़िल्म देखेंगे? — KRK (@kamaalrkhan) June 18, 2020 आलिया भट्टवर सध्या सोशल मीडियाव्दारे प्रचंड टीका होत आहे. या टीकेमुळे तिची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.