‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे कलाकार व दिग्दर्शक यांच्यावर जेवढी टीका झाली तेवढीच किंबहुना त्याहून कित्येक पटीने जास्त टीका याचे लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर झाली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा मिळाल्या. त्यानंतर मनोज यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. आता याच वादामुळे मनोज मुंतशीर पुन्हा चर्चेत आले आहेत.

मनोज यांनी ‘आज तक’शी संवाद साधताना या विषयावर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात इतकी नकारात्मकता पसरली होती की, ते ब्रेक घेऊन परदेश दौऱ्यावर गेले होते. याबरोबरच आता या मुद्द्यावर त्यांनी आपली चूक मान्य करत चित्रपटाची कथा लिहिण्यात मोठी चूक झाल्याचेही मनोज यांनी कबूल केले. मनोज म्हणाले, “मी माझ्या चुकीच्या लिखाणावर पडदा टाकायचा प्रयत्न कधीच करणार नाही. शंभर टक्के माझ्याकडून चूक झाली आहे.” याबरोबरच ही चूक जाणूनबुजून केली नसल्याचंही त्यांनी मान्य केलं.

common men suffer due to traffic jam caused by political leaders roadshow zws
अन्वयार्थ : प्रचार विरुद्ध संचार!
Sanjay raut on narendra modi (5)
“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे पंतप्रधानांनी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले “यासारखी अमानुष गोष्ट नाही!
Praful Patel
जिरेटोपाच्या वादावर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “यापुढे काळजी…”
What Shahi Tharoor Said About Sharad Pawar?
शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया, “आम्ही तर रेड कार्पेट अंथरुन..”
Mihir Kotecha, Sanjay Patil,
मुंबई विकासावर चर्चा करण्याचे कोटेचा यांचे संजय पाटील यांना आव्हान
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
Ajit pawar on sharad pawars
“८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”
abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”

आणखी वाचा : ९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधून आणणाऱ्याला सनी लिओनी देणार ५०,००० रुपये; चिमूरडीशी अभिनेत्रीचा नेमका संबंध काय?

या घटनेतून मनोज यांना चांगलाच धडा मिळाला असल्याचंही त्यांनी मान्य केलं. मनोज म्हणाले, “धार्मिक भावना दुखवण्याचा, सनातन धर्माचा अपमान करण्याचा, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या प्रतिमा मलिन करायचा माझा अजिबात हेतू नव्हता.” या चित्रपटामुळे जो वाद निर्माण झाला त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवरही झाल्याचं मनोज यांनी स्पष्ट केलं. पुढे ‘बाहुबली’ चित्रपटाचा उल्लेखही त्यांनी केला.

त्याबद्दल मनोज म्हणाले, “याआधी मी ‘बाहुबली’सारखा चित्रपटही लिहिला आहे, ‘तेरी मिट्टी’, ‘देश मेरे’सारखी गाणीही लिहिली आहेत. आज देशात रामनवमी असो किंवा दिवाळी त्यादिवशी माझ्या गाण्यांशिवाय सण साजरे होत नाहीत ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. एक चूक माझ्या हातून घडली आहे, तर तुम्ही माझ्या हातून माझी लेखणी काढून घेणार आहात का? दुसरी संधी प्रत्येकालाच मिळायला हवी.” यादरम्यान मनोज यांनी ‘आदिपुरुष’मुळे निर्माण झालेल्या वादाचा आपल्या कुटुंबियांवरही परिणाम झाल्याचं स्पष्ट केलं.