रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. मात्र, चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्समुळे या चित्रपटावर मोठया प्रमाणात टीका होताना दिसत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर तर चित्रपट समीक्षक तसेच काही कलाकारांनी या चित्रपटावर टीका केली आहे. आता नुकतेच कंगना राणौतनेही अ‍ॅनिमल’वर टीका केली आहे.

सोशल मीडिया हँडल X वर एका यूजरने कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाची प्रशंसा केली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई का करु शकला नाही याबाबत आश्चर्यही व्यक्त केले होते. युजरच्या या ट्वीटला प्रत्युत्तर देताना कंगनाने अप्रत्यरित्या रणबीरच्या अ‍ॅनिमलवर निशाणा साधला आहे.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

कंगनाने ट्वीट करीत लिहिले, “माझ्या चित्रपटांसाठी सशुल्क नकारात्मकता मोठ्या प्रमाणात पसरवली जाते. मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे; पण प्रेक्षकांना असेच चित्रपट आवडतात ज्यात महिलांना मारहाण केली जाते, ज्यात महिलांना एखाद्या वस्तूसारखे वागवले जाते. जे पुरुष एका स्त्रीला आपले जीवन समर्पित करतात अशा व्यक्तींसाठी असले चित्रपट अत्यंत निराशाजनक आहे. सशक्तिकरण सारखे चित्रपट येत्या काळात माझे करिअर बदलू शकतात. मला माझ्या आयुष्यातील सर्वात्तम वर्ष काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यात घालवायची आहेत.”

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

कंगना अगोदर बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, कवी जावेद अख्तर यांनी ‘अ‍ॅनिमल’वर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. जावेद अख्तर यांनी चित्रपटातील तृप्ती डीमरीच्या बूट चाटण्याच्या सीनचा उल्लेख केला होता. तसेच अशा प्रकारचा सिनेमा हिट होणे ही बाब चिंतेची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- “आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा आणू नका”, मालदीव Vs लक्षद्वीप वादावर स्पष्टच बोलले अमिताभ बच्चन; म्हणाले, “हे खूप…”

‘अ‍ॅनिमल’ला मिळालेले यश साजरे करण्यासाठी नुकतीच एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट सहभागी झाली होती. दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’च्या कथेवरून सुरू झालेल्या वादावर अभिनेता रणबीर कपूरने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. रणबीर म्हणाला, “हा एक असा चित्रपट आहे; ज्यावर काही लोकांचा आक्षेप होता. पण मला वाटतं की, चित्रपटाला मिळालेलं प्रेम, यश व चित्रपटाची कमाई सगळं काही सांगून जातात. चित्रपटाला मिळालेल्या प्रेमापेक्षा मोठं काहीही नाही आणि चित्रपटापेक्षा मोठं काहीही नाही.”