आमिर खान आणि किरण राव तीन वर्षांपूर्वी विभक्त झाले. घटस्फोट घेतला असला तरी ते दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. आयरा खानच्या लग्नातही किरण सहभागी झाली होती, सोमवारी दोघेही मतदानासाठी एकत्र गेले होते. त्यामुळे घटस्फोटानंतरही किरण व आमिर खूपदा एकमेकांबरोबर दिसतात. लग्नापूर्वी किरण व आमिर वर्षभर एकत्र राहिले होते, याचा खुलासा तिनेच केला आहे.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत किरण राव म्हणाली, “आमिर आणि मी लग्नाच्या आधी वर्षभर एकत्र राहत होतो. आम्हाला जास्त काळ एकत्र राहायचं होतं, पण आमच्या पालकांना वाटत होतं की आम्ही लग्न करून एकत्र राहावं. लग्न ही एक सुंदर गोष्ट आहे परंतु लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की अशा परिस्थितीत महिलांना अनेकदा स्वतःसाठी कमी वेळ मिळतो, कारण त्यांनी घर सांभाळणं आणि पतीच्या कुटुंबाची नाती जपणं अपेक्षित असतं.”

Raj Thackeray, Jay Malokar, Raj Thackeray Consoles Jay Malokar family, raj Thackeray akola visit, MNS, Jay Malokar, Akola visit, Raj Thackeray Vidarbha tour
अकोला : जय मालोकारच्या कुटुंबाचे राज ठाकरेंकडून सांत्वन, घातपात झाल्याचा…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
women police constable caught escaped prisoner in market area pune
पुणे : आर्थिक वादातून वकिलाकडून मित्राच्या वडिलांचे अपहरण
kidnap, girl, kidnap attempt thane,
ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
minor student raped by school bus driver in chandigarh
Chandigarh : संतापजनक! कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमध्ये शाळेच्या बस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक
The High Court acquitted three doctors in Bandra West in the death of a minor girl who performed surrogacy Mumbai news
स्त्रीबीज दानावेळी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे प्रकरण: तीन डॉक्टर प्रकरणातून दोषमुक्त
Rape girl Ambernath, Rape of girl,
वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, ७५ वर्षीय आरोपी अटकेत, अंबरनाथमध्ये संताप
pune, firing case
पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार, ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

किरण पुढे म्हणाली, “लग्न या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, त्याची काय व्याख्या करता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण लग्न एका उद्देशासाठी असतं आणि नंतर खूप लोकांसाठी सामाजिक स्वीकार्यता महत्त्वाची असते. मुलांसाठी लग्न महत्त्वाचं असतं. लग्नामुळे तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. लग्न तुम्हाला एक नवीन कुटुंब देतं, ते खूप सारी नाती देतं, तसेच लग्न तुम्हाला सुरक्षिततेची आणि स्थिरतेची भावना देतं.”

‘ती’च्याशी अफेअरची चर्चा अन् ६१ वर्षांचे संजय लीला भन्साळी अद्याप अविवाहित; एकदा म्हणालेले, “ज्यांचं लग्नाचं वय उलटून…”

किरण रावने लग्नानंतर महिलांवर पडत असलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याबद्दल भाष्य केलं. स्त्रीने घरातील सगळी कामं करणं, संपूर्ण घर सांभाळणं ही अपेक्षा लग्नानंतर तिच्याकडून असते. “घर चालवण्याची आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याची जबाबदारी महिलांवर असते. महिलांनी सासरच्या लोकांशी संपर्क ठेवणं अपेक्षित असते. महिलांनी पतीच्या कुटुंबाशी आपुलकीने, प्रेमाने वागणं अपेक्षत असतं. या अपेक्षा खूप आहेत, असं मला वाटतं. त्यामुळे या जबाबदाऱ्यांवर चर्चा होणं आवश्यक आहे, असं मला वाटतं,” असं मत किरणने मांडलं.

Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर

किरणला कधी घटस्फोटाची भीती वाटायची का? असं विचारल्यावर म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला वेळ घालवला आणि कधीच घटस्फोटाची चिंता मला नव्हती. मी आणि आमिर दोन व्यक्ती म्हणून एका खूप मजबूत नातेसंबंधात आहोत. आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, ही गोष्ट घटस्फोटानंतरही बदललेली नाही.”