श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीतर्फे अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या जीवनावरील ‘हम गया नही जिंदा है’ या महानाटय़ाचे प्रयोग २८ आणि २९ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. महानाटय़ाचे लेखन, संयोजन, गीत, संगीत आणि दिग्दर्शन दास दिगंबर यांचे असून महानाटय़ात ते स्वत: स्वामी समर्थाची भूमिका साकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ हजार ४०० चौरस फुटांचा रंगमंच आणि १२५ कलाकारांचा सहभाग हे या महानाटय़ाचे वैशिष्टय़ आहे. माहीम बस आगाराच्या बाजूला असलेल्या मच्छिमार वसाहतीजवळील मृदुंगाचार्य नारायण कोळी मैदानात संध्याकाळी सव्वासहा वाजता हे महानाटय़ रंगणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great drama on life of swami samarth
First published on: 22-01-2017 at 00:13 IST