२१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐतिहासिक ‘महाभारत’ ही मालिका पाहता येत आहे. २८ मार्चपासून दुपारी १२ व संध्याकाळी सात वाजता ही मालिका डीडी भारतीवर प्रसारित केली जात आहे. छोट्या पडद्यावरील ही सर्वोत्तम मालिका समजली जायची. टीआरपीचे सर्व विक्रम या मालिकेने मोडले. केवळ भारतातच नाही तर युके आणि इतर देशांमध्येही ही मालिका लोकप्रिय होती. मात्र या मालिकेतील कलाकारांना त्यावेळी किती मानधन मिळायचे, माहित आहे का?

‘टेलीचक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘महाभारत’च्या संपूर्ण स्टारकास्टला एका एपिसोडसाठी फक्त तीन हजार रुपये मानधन मिळायचे. या मालिकेतील बहुतांश कलाकार हे नवोदित असल्याने त्यांचं मानधन समानच ठेवण्यात आलं होतं. ही रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल कारण आताच्या मालिकेतील कलाकार कोट्यवधींमध्ये कमाई करतात. छोट्या कलाकारांनाही आता लाखभर रुपये मानधन मिळतं. मात्र त्यावेळी एका एपिसोडसाठी तीन हजार रुपये ही रक्कम काही छोटी नव्हती.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

पाहा फोटो : सोनाली कुलकर्णी ते रिंकू राजगुरू; विनामेकअप अशा दिसतात मराठी तारका

‘महाभारत’ मालिकेची स्टारकास्ट फार तगडी होती. यातील पुनीत इस्सरसारख्या कलाकारांनी आधीच नाव कमावलं होतं तर मुकेश खन्नासारखे अभिनेते नंतर प्रकाशझोतात आले. ‘महाभारत’ ही संपूर्ण मालिका बनवण्यासाठी जवळपास ९ कोटी रुपयांचा खर्च आला होता.