हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी यांनी विविध पात्रं साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘सत्या’ चित्रपटातील भिकू म्हात्रेपासून ते ‘फॅमिली मॅन’ या ओटीटी मालिकेतील श्रीकांत तिवारीपर्यंत वेगवेगळय़ा भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर ओटीटी माध्यमांवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता त्यांच्या झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘सायलेन्स’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या आबान भरुचा देवहंस दिग्दर्शित या थरारपटात मनोज बाजपेयी, प्राची देसाई, अर्जुन माथूर, बरखा सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटात एसीपी अविनाश वर्मा ही भूमिका साकारली आहे. एका उच्चभ्रू महिलेच्या हत्येचा छडा एसीपी अविनाश वर्मा आणि त्यांचे सहकारी कशाप्रकारे लावतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सायलेन्स-२’ प्रदर्शित होत असून यामध्ये एसीपी अविनाश वर्मा नवीन प्रकरणाची उकल करताना पाहायला मिळणार आहेत.

‘सायलेन्स-२’ या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, ‘‘मी प्रेक्षकांसाठी ‘सायलेन्स’ या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येताना खूप उत्साही आहे. या भूमिकेसाठी मला मिळालेले प्रेम आणि कौतुकाबद्दल मी आभारी आहे. एक अभिनेता म्हणून मी नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असतो. एसीपी अविनाश हीदेखील अशीच एक आव्हानात्मक भूमिका आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा नवीन चित्रपट नक्की आवडेल’’.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’