महिलांच्या विरोधात गुन्हयांमध्ये होत असलेली वाढ पाहता मुलींसह कसे वागावे याची शिकवण पालकांनी मुलांना दिली पाहिजे, असे मत शाहरुखने व्यक्त केले आहे.
महिलांविरुद्धच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत विचारले असता शाहरुख म्हणाला की, घरी मुलांना वाढवण्याच्या संकल्पनेत बदल करावा लागेल. मुलांना महिलांशी सभ्यपणे आणि आदराने वागण्याची शिकवण देण्याची गरज आहे. मी माझ्या मुलाला (आर्यन) कधीही कोणत्याही मुलीचे हृदय दुखावू नको, असे सांगतो. मी आर्यनला म्हणालो, मुलींचे मन दुखावू नकोस. मुलींशी हळुवार आणि सभ्यपणे वागावे, जर तुझ्याकडून कोणत्याही मुलीवर अत्याचार झाल्याचे कळले तर मी तुला कधीच माफ करणार नाही.
महिलांच्या सुरक्षेची समस्या ही केवळ भारतात नाही तर जगभरात आहे. महिलांच्या सुरक्षेचा विषय ज्यावेळेस येतो तेव्हा संपूर्ण देशाने, संपूर्ण जगाने त्याबाबत विचार करायला हवा, असेही शाहरुख म्हणाला.