बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अन् याचा सर्वाधिक दोष दिला जातोय निर्माता करण जौहरला. करणने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. मात्र या पोस्टमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. परिणामी करणची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे.

 

mumbai traffic police marathi news
मुंबई: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, २ हजार १८९ दंडात्मक कारवाया
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
View this post on Instagram

 

I blame myself for not being in touch with you for the past year….. I have felt at times like you may have needed people to share your life with…but somehow I never followed up on that feeling…will never make that mistake again…we live in very energetic and noisy but still very isolated times …some of us succumb to these silences and go within…we need to not just make relationships but also constantly nurture them….Sushants unfortunate demise has been a huge wake up call to me …to my level of compassion and to my ability to foster and protect my equations…..I hope this resonates with all of you as well….will miss your infectious smile and your bear hug ….

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

“गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे.” अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती. मात्र ही पोस्ट नेटकऱ्यांनी आवडली नाही. ‘नेपोटीझम प्रमोटर’ असं म्हणत त्यांनी करणवर टीका करण्यास सुरुवात केली. एवढेच काय तर केवळ २० मिनिटांमध्ये त्याचे १० लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले. यापूर्वी त्याला तब्बल १ कोटी १० लाख लोकं फॉलो करत होते. त्याच्या इन्स्टा प्रकरणामुळे हा आकडा आता १ कोटींवर आला आहे.

तर दुसरीकडे कंगना रनौतचे मात्र फॉलोअर्स वाढले आहेत. तिने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला दोष दिला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल १२ लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे केवळ २० लाख फॉलोअर्स होते. आता ३२ लाख लोक तिला फॉलो करत आहेत.