छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत नुकतीच राजनंदिनी या भूमिकेची एण्ट्री झाली. त्यानंतर कथेत कोणतं रंगतदार वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. मात्र आता ही मालिका लवकरच संपणार असल्याची माहिती खुद्द सुबोध भावेनं दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘येत्या जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार आहे. मालिकाची कथा एवढीत होती. त्यात उगाच ओढून ताणून खतपाणी घालून कथा वाढवणार नाही हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे काही रंगतदार वळणांनंतर जुलैपर्यंत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल’ अशी माहिती सुबोधनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula pahate re marathi serial to end soon subodh bhave gayatri datar
First published on: 05-06-2019 at 11:59 IST