मुंबईत बुधवारी १,०६९ करोना रुग्णांची नोंद झाली असून, २२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ५६५ करोनाबाधित आढळून आले.

गेल्या आठ दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत येत होती. बुधवारी अचानक रुग्ण संख्या वाढली. मात्र, उपचाराधीन रुग्णांत घट झाली असून, सध्या केवळ १२,६७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ४८९ इतकी झाली आहे.