छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानाची एअरोब्रिजला धडक बसल्याची घटना आज सायंकाळी घडली. मुंबईहून रियादला जात असलेले हे विमान उड्डाणापूर्वीच एअरोब्रिजला धडकले. या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी हानी टळल्याचे अधिका-यांनी सांगितले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमान पार्क करताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूला असलेल्या इंजिनला साधारण नुकसान झाल्याचे कळते. दरम्यान, या विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. तसेच, या अपघातामुळे विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम न झाल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
air-india3