प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे भाकित

देशात आणि राज्यात सामाजिक एकता, अखंडता धोक्यात आणणा या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र निती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वसने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची जुमलेबाजी जनता आता स्विकारणार नसून २०१९ साली भाजपची हकालपट्टी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.मंत्रालयाला आत्महत्यालय करणारे शेकडो कोटींची उधळपट्टी करून स्थापना दिवसाचा उत्सव करत आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील २१ मंत्र्यांवर गंभीर घोटाळ्यमचे आरोप आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मंत्रीमंडळातील घोटाळेबाज मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजप अध्यक्ष अमित शहा भ्रष्टाचाराच्या डोंगरावर उभे राहून पारदर्शकतेच्या वल्गना करित आहेत हे हास्यास्पद आहे. गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत भाजप हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे असा टोला चव्हाण यांनी लगावला.