ठाण्याजवळील पारसिक बोगद्यानजिक रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्यानजिक रेल्वे रूळाला तडे गेल्यानं ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्य़ांची लांबच लांब रांग पहायला मिळत आहे.

दरम्यान, याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासानानं काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच युद्धपातळीवर हे काम सुरू असून लवकरच रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.