करोना विषाणू संक्रमणानंतर बदललेल्या जगण्यातील इतर समस्यांबरोबरच शालेय शिक्षणात निर्माण झालेल्या अडचणी कशा सोडवणार, हा मोठा प्रश्न सध्या पालक आणि शिक्षकांसमोर आहे. शासनाने ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा पर्याय जाहीर केला असला तरी त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी ‘चतुरंग चर्चे’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘ऑनलाइन शाळा, ऑफलाइन शिक्षण’ हा चर्चेचा विषय आहे. आज, सोमवारी, ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘वेबिनार’च्या माध्यमातून होणाऱ्या या परिसंवादात शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचा प्रमुख सहभाग असेल. या कार्यक्रमात ‘ऑनलाइन शिक्षणाचे फायदे-तोटे’ या विषयावर चर्चा होईल. ‘ऑनलाइन’ शिक्षणामागची सरकारची भूमिका नेमकी काय आहे, शाळांची भूमिका कशी असेल आणि या बदलाविषयी पालकांना काय वाटते, यावर प्रकाश टाकला जाईल. ऑनलाइन शाळा सुरू झाल्यास प्रत्येकाच्या घरी इंटरनेट कसे पोहोचेल, या प्रश्नापासून घरून अभ्यास करणारी मुले खरोखरच गांभीर्याने तो करू शकतील का, नेमका अभ्यासक्रम काय असणार, वेळ काय असेल, तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण, गृहपाठ तपासणे, परीक्षा घेणे याविषयीच्या पालकांच्या प्रश्नांना मान्यवर उत्तरे देतील.

वक्ते.. शालेय शिक्षणमंत्री

वर्षां गायकवाड, ‘अक्षरनंदन’ शाळेच्या शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन, शैक्षणिक अभ्यासक श्रुती पानसे या परिसंवादात सहभागी होणार आहेत.

नोंदणीसाठी : https://tiny.cc/LS_ChaturangCharcha_6July येथे नोंदणी आवश्यक