जीर्ण पुलांवरील वाहतुकीवर र्निबध; लालबाग, परळमधील मंडळांना प्रामुख्याने फटका अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालणारी मुंबईतील गणेशविसर्जन मिरवणूक यंदा शनिवारी दुपापर्यंत चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील २० रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनले असल्याने तेथून विसर्जन मिरवणुकीतील गणेशभक्तांना गटागटाने सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत विसर्जन मिरवणुका रखडण्याची चिन्हे आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील २० पूल जुने झाले असून ते धोकादायक ठरवण्यात आले आहेत. या पुलावर १६ टनांपेक्षा अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सव मंडळांच्या मागणीमुळे त्यांना या पुलावरून विसर्जन मिरवणुका नेण्याची परवानगी पालिका व पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याकरिता र्निबध घालण्यात आले आहेत. या र्निबधांमुळे गुरुवारी पालिका, पोलीस आणि मंडळांचे कार्यकर्ते यांची अक्षरश: कसोटी लागणार आहे. त्यातही चिंचपोकळी आणि करीरोडच्या पुलांबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लालबाग, परळमधील मंडळांचे विसर्जन लांबण्याची शक्यता आहे. दरवर्षी सकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता विसर्जन पूर्ण होते. यंदा मात्र या मिरवणुका २६ ते २७ तास चालण्याची शक्यता आहे. खड्डे, पाऊस याबरोबरीने गुरुवारी पुलांच्या सुरक्षेचे अडथळे मंडळांना पार पाडावे लागणार आहेत. त्यामुळे मंडळांनी विसर्जन मिरवणुका लवकर सुरू कराव्या असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी केले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्वाधिक ताण चिंचपोकळी पुलावरून एकापाठोपाठ एक गणेशमूर्ती दर वर्षी जात असतात. केवळ लालबाग-परळमधीलच नाही तर थेट चेंबूरपासून ज्या मंडळांच्या गणेशमूर्ती सहा फुटांहून उंच आहेत ती शेकडो मंडळे गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचाच वापर करतात. एका वेळेला एकाच गणेशमूर्तीची ट्रॉली पुलावरून न्यावी असे पालिकेचे निर्देश असल्यामुळे या मिरवणुका रखडणार असल्याची भीती या विभागातील नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केली. चिंचपोकळीच्या पुलावर नऊ वाजल्यापासून लोकांची गर्दी जमलेली असते. लालबागच्या राजाची मिरवणूक साधारणत: दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चिंचपोकळीच्या पुलावर येते. त्याआधी गणेशगल्ली, चिंचपोकळी, तेजुकाया मॅन्शन, कॉटनचा राजा, नरेपार्क या प्रमुख मंडळांच्या मिरवणुका एका पाठोपाठ जातात. लालबागच्या राजाची मिरवणूक या पुलावरून गेल्यानंतर गर्दी ओसरते. त्यामुळे तोपर्यंतचा काळ हा कार्यकर्ते, पोलीस आणि पालिका यांच्यासाठी कसोटीचा असणार असल्याची भीती पडवळ यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांची सज्जता अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळांच्या सुमारे पाच हजार ६३० गणेशमूर्ती तर ३१ हजार ७२ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. एकूण १२९ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली असून संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त असेल. मिरवणुकांचे नियमन करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांव्यतिरिक्त अतिरिक्त ४० हजार जवानांची कुमक तैनात असेल. सुमारे ५ हजाराहून अधिक कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शहरातील संवेदनशील भागांवर नजर ठेवण्यात येईल. जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, पवई गणेश घाट या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष असेल. चौपाटीवर आणि विसर्जन स्थळी जलतरणपट्टू, तटरक्षक दल आणि नौदलाच्या बोटी व लाँच उपलब्ध केल्या असून जीवरक्षक जवानही कार्यरत असतील. महिलांशी छेडछाड, चोरी, अपहरण असे प्रकार रोखण्यासाठी साध्यावेशात पोलिसांची पथके. वाहतुकीचे र्निबध पुलावरून गटागटाने सोडणार. धोकादायक पुलावर १६ टनांपेक्षा अधिक भार येऊ न देण्याची दक्षता. पुलांवर ध्वनिक्षेपक लावण्यास, वाद्ये वाजवण्यास, नृत्य करण्यास मज्जाव. पुलावर मिरवणूक थांबवण्यास मनाई. ५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद विसर्जन मिरवणुकीत होणारी कोंडी टाळण्यासाठी शहरातील ५३ रस्ते वाहतुकीसाठी गुरुवारी बंद ठेवण्यात आले आहेत. तर ५६ रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. मिरवणुकांना अडथळा होऊ नये, यासाठी ९९ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ जाहीर करण्यात आले आहे. १८ रस्त्यांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त (अभियान) प्रणया अशोक यांनी दिली. पालिकेची तयारी कृत्रिम तलाव-३२ नैसर्गिक विसर्जनस्थळे - ६९ किनाऱ्यावर जाड लोखंडी फळ्या - ८९६ छोटय़ा गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी - ४५ जर्मन तराफे जीवरक्षक - ६३६ मोटर बोटी- ६५ निर्माल्य कलश - २१८ निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी - २६७ वाहने आरोग्य विभागाची प्रथमोपचार केंद्रे - ६९ फ्लडलाइट - २७१७ सर्चलाईट, (शोध दीप) - ८३ फिरती शौचालये - ८४ सुसज्ज रुग्णवाहिका झ्र् ६५