‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनी आणि वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी वृत्ते प्रसारित करत असल्याचा आरोप करत एका माजी साहाय्यक पोलीस अधिकाऱ्याने दिवाणी न्यायालायात वाहिनी आणि अर्णब यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

इक्बाल शेख असे या माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ‘टीआरपी’ घोटाळ्याशी संबंधित बातम्या देण्यापासून अर्णब यांना रोखावे, अशी मागणी केली आहे.