मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन
यवतमाळ जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्य सरकार करीत असलेल्या विविधांगी उपाययोजनांमुळे गेल्या तीन महिन्यात निम्म्याने कमी झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी केले. ‘बळीराजा चेतना अभियान’ सह अनेक उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यात यश मिळाले असल्याचे खडसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झालेला असताना यवतमाळ जिल्ह्यात हे प्रमाण घटले असल्याने सरकारची पावले योग्य दिशेने पडत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यत ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर्षी हा आकडा ४८ इतका खाली आला आहे. म्हणजे आत्महत्यांचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे खडसे यांनी सांगितले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात यवतमाळमध्ये ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फेब्रुवारीत गेल्यावर्षी ३८ तर यावर्षांत १४ तर मार्चमध्ये गेल्यावर्षी २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, यावर्षी १४ शेतकऱ्यांनी केल्या, अशीही माहिती त्यांनी दिली.

चेतना अभियान
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत, यासाठी यवतमाळ जिल्ह्यत २४ जुलै २०१५ रोजी बळीराजा चेतना अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३२ कोटी रुपये अनुदान दिले असल्याचे खडसे यांनी सांगितले. यवतमाळ व उस्मानाबाद हे जिल्हे पुढील काळात शेतकरी आत्महत्या मुक्त होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस व खडसे यांनी व्यक्त केला.

government schemes Eknath shinde marathi news
सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
cm eknath shinde inaugurates bow string’ arch bridge connecting coastal road sea link
सागरी सेतूमुळे परदेशात आल्याचा भास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
leaders pay tributes for Sitaram Yechury
Sitaram Yechurys Death : ‘डाव्या पक्षांचा आवाज हरपला’
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
Jayant Patil On Supriya Sule Sharad Pawar
Jayant Patil : सुप्रिया सुळे की जयंत पाटील? शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? जयंत पाटील म्हणाले, “त्यांचा निर्णय…”
samarjeet singh ghatge
कोल्हापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का! समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश
sambhaji brigade workers staged a strong protest in front of sculptor jaideep apte house in kalyan
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने

जालन्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जालना : गेल्या सव्वातीन महिन्यांत जिल्ह्य़ात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पैकी १८ प्रकरणे शासकीय मदत देण्यासाठी प्रलंबित आहेत. या प्रकरणात जिल्हा प्रशासनास मदत देण्यासाठी रासायनिक परीक्षण अहवालाची प्रतीक्षा आहे. ३६ पैकी १० प्रकरणे मदतीस पात्र, तर ८ अपात्र ठरविण्यात आली.
जानेवारीत १६, फेब्रुवारी ९ व मार्चमध्ये ६ शेतक ऱ्यांनी, तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली. गेल्या वर्षी ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ७१ प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली, चौकशीसाठी ८ प्रकरणे प्रलंबित आहेत. २०१५ मधील शेतकरी आत्महत्येची चार प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांनी पत्रकारांना सांगितले.