खरीपाच्या पीकासाठी हा महत्वाचा काळ असून महाराष्ट्रातील सर्व बँकांना शेतीसाठी कर्ज देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिले आहे.

पीक कर्ज वाटपाची गती बँकांनी वाढवावी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तसे निर्देश द्यावेत असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे पण बँकांकडून संथगतीने कर्ज वाटप सुरु आहे.

बँकांच्या या प्रतिसादाची राज्य सरकारने दखल घेतली असून केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.