जगभरात विखुरलेल्या भारतीयांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रवासी भारतीय दिवसाचे’ यंदाचे १३ वे वर्ष. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या दिनाचे औचित्य साधून २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे.  विशेष म्हणजे, यावर्षी महात्मा गांधी यांच्या भारतात परतण्यास १०० वर्षे पूर्ण होत आहेत.  त्यानिमित्ताने महात्मा गांधींच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.