रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांची परवड

मुंबई : करोना संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत रोजगार गमावल्याने, तसेच संसर्गाच्या भीतीपोटी गावची वाट धरलेल्या अनेकांच्या शिधापत्रिका स्थगित करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर धान्याची भ्रांत निर्माण झाली आहे. दरम्यान, स्थगित के लेल्या शिधापत्रिका संबंधितांनी कागदपत्र सादर के ल्यानंतर पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरीही शिधावाटप दुकानचालकनागरिकांची अडवणूक करत असल्याच्या घटना मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर घडत आहेत.

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

‘माझ्या पतीचे निधन झाल्याने मला गावी जावे लागले. आठ महिन्यांनी आल्यावर धान्य घ्यायला गेले तेव्हा शिधापत्रिका स्थगितझाल्याचे समजले. सहा महिन्यांनी हा प्रश्न सुटणार असे सांगून दुकानदाराने मला परत पाठवले. कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीवर असल्याने उपासमार होत आहे,’ अशी व्यथा कांदिवलीतील सुमन शर्मा यांनी मांडली.

चार महिने रेशन घेतले नाही तर शिधापत्रिका बंद होते असे दुकानदाराकडून सांगण्यात येत आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुमच्याकडे गाडी आहे का, घरात काय काय उपकरणे आहेत असे प्रश्न विचारले जात आहेत. आजकाल सर्वसामान्यांच्या घरात निरनिराळी उपकरणे असतातच. त्यामुळे ती असतील तर शिधापत्रिका पुन्हा सुरू होणार नाही का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष नाईक यांनी उपस्थित के ला आहे.

प्रत्येक शिधावाटप दुकानात किमान ५० हून अधिक लाभार्थ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अधिक पैसे मोजून बाजारातून धान्य विकत घेणे शक्य असलेले लाभार्थी या संदर्भात फारशी कु रकु र करीत नाहीत. मात्र के वळ शिधावाटप दुकानातील धान्यावर पोटाची खळगी भरणारा मोठा वर्ग आहे. शिधावाटप पत्रिका स्थगित झालेल्या लाभार्थीना काही दुकानदार सहकार्य करीत आहेत; परंतु काही दुकानदार नागरिकांची बोळवण करीत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

शिधापत्रिका स्थगित होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आधार कार्ड जोडले नसल्यामुळे शिधापत्रिका स्थगित होऊ शकते. टाळेबंदीच्या काळात लोक गावी गेल्याने अनेक दुकानदारांनी गैरव्यवहार करून धान्य लुटले. त्यामुळे बऱ्याच शिधापत्रिका स्थगित करण्यात आल्या आहेत. अशी अडचण आल्यास लोकांनी शिधावाटप अधिकाऱ्याकडे अर्ज करावा. संबंधित कागदपत्रांची पूर्तता होताच शिधापत्रिका पुन्हा सुरू होईल.    

-कैलास पगारे, नियंत्रक, शिधावाटप, मुंबई</strong>