मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या गुंडांना आवरावे, अन्यथा मोठया संघर्षाची परिस्थीती निर्माण होईल, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.


पनवेलमध्ये मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर भाजपाच्या नगरसेवकाकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या नांदगावकर यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.