दोन दिवसात मुंबई आणि परिसरातील किमान आणि कमाल तापमानात सुमारे ५ अंशांची वाढ झाली. त्यामुळे शनिवारी मुंबईतील थंडी एकदम कमी झाली.

गुरुवारच्या किमान तापमानात पाच अंशाने वाढ होऊ न ते २१.५ अंशावर, कमाल तापमनात ५ अंशाने वाढ होऊन ३४ अंशावर पोहचले. पुढील दोन दिवसात मुंबईचे तापमान २ अंशाने कमी अधिक होत राहील.

शनिवारी मध्य महाराष्ट्रात देखील किमान तापमानात वाढ झाली. जळगाव वगळता सर्वत्र किमान तापमान १३ ते १९ अंश दरम्यान नोंदविण्यात आले. विदर्भात मात्र तापमान घाट होऊन किमान तापमान ६ ते १० अंश होते.