तुडुंब गर्दीवर रेल्वेची तातडीची उपाययोजना; रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीची शिफारस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील गर्दी टाळण्याच्या उपायांचा आढावा घेणाऱ्या दोन समिती केंद्र सरकारने स्थापन केल्या होत्या. यापैकी पश्चिम रेल्वेसाठीच्या समितीने काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या दोन गाडय़ा धावतात. ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवणार असून त्यांपैकी पहिली गाडी येत्या महिन्याभरात पश्चिम रेल्वेवर दाखल होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 coach train will increase in western railway
First published on: 13-01-2016 at 04:41 IST