मुंबई : गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. मराठवाडयात जेमतेम ३१ टक्के जलसाठा उपलब्ध असून आजमितीस दीड हजार गाव- वाडयांमध्ये ५११ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच काळात केवळ पालघर तालुक्यातील दोन वाडयांमध्येच दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. 

राज्यात गेल्या वर्षी जानेवारी अखेर पालघर तालुक्यातील तीन आदिवासी पाडयांमध्ये टँकरने पाणीपरवठा करावा लागला होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे छोटे छोटे जलस्त्रोत आटू लागले असून धरणांमधील पाणीसाठयातही घट होऊ लागली आहे. थंडीमुळे पिकांसाठी पाण्याची मागणी गेले महिनाभर कमी असली तरी आता थंडी कमी होऊ लागल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात छोटे नाले, नदीपात्रातील जलस्त्रोत बंद होऊ लागल्याने टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.

It is feared that most of the villages will be affected by the development projects in Thane district even during the rainy season
ठाणे जिल्ह्यात ‘समृद्धी’ने पुराची अवकळा
Pune, water storage, state dams, heavy rains, 10.38%, 148.71 TMC, 47.30%, Konkan division, Pune division, Nashik division, Marathwada division, Amravati division, Nagpur division,
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७६ टीएमसी, गेल्या पाच दिवसांत १४८ टीएमसीने वाढ
Three thousand winter fever in the maharashtra state in a month Mumbai
राज्यात महिनाभरात हिवतापाचे तीन हजार, तर डेंग्यूचे दोन हजार रुग्ण
Zika, Zika virus, Zika virus symptoms,
राज्यात १५ दिवसांत सापडले झिकाचे २० रुग्ण, ‘अशी’ घ्या काळजी
Heavy Rainfall in Thane District, Knee-deep water accumulated near kamwari river house, Severe Flooding in Bhiwandi, Disrupts Life and Commerce, Heavy Rainfall in Bhiwandi, Bhiwandi news, marathi news, latest news,
भिवंडी पावसाचे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, कामवारी नदी काठच्या वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले
Increase in water level of dams in the maharashtra state pune
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ; आठ दिवसांत ६८ टीएमसी पाणीसाठा
Nine persons trapped in flood water in Awar were rescued by the teams of Natural Disaster Prevention Department
बुलढाणा : खामगावात अतिवृष्टीचे तांडव; आवार मध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पुराने वेढलेल्या नऊ व्यक्ती…
Bridge collapsed in Bihar
बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला; १५ दिवसांतील दहावी घटना

हेही वाचा >>> दीड वर्षांत २४ हजार पोलीस भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी

टँकरग्रस्त गावे, वाडया

* राज्यात ४५६ गावे, १०८७ वाडयांमध्ये सध्या ५११ टँकरने पाणी पुरवठा. यांपैकी केवळ ४७ टँकर शासकीय उर्वरित खासगी. 

* सर्वाधिक धरणे असलेल्या नाशिक जिल्ह्यातच सर्वाधिक १२८ गावे व २५५ वाडयांमध्ये १२३ टँकरने पाणीपुरवठा.

* छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ११० गाव-वाडयांमध्ये १०५ टँकरने पाणीपुरवठा.

* सातारा जिल्ह्यात ४०, सांगली जिल्ह्यात ४३ टँकरने पाणीपुरवठा, जिल्ह्यांत टँकरची वाढती मागणी.

विभागवार जलसाठा..

नागपूर विभागातील विविध धरणांमध्ये ६२ टक्के, अमरावती विभागात ६५ टक्के, नाशिस विभागात ५८ टक्के, पुणे विभागात ५६ चक्के तर कोकणातील विविध धरणांमध्ये ६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राज्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईचा विचार करून आतापासूनच युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.