अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना आस कायम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकरावीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी घेतलेले प्रवेश रद्द करून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या प्रवेशफेरीमध्ये सहभागी होण्याकरिता आता विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक नाहीत तरीही विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांचा अट्टहास धरून निश्चित केलेले प्रवेश रद्द करत आहेत. एकीकडे शासननिर्णयानुसार, विद्यार्थ्यांला प्रवेश रद्द करण्यापासून रोखता येत नाही, तर दुसरीकडे पालक आणि विद्यार्थी रिक्त जागांचा विचार न करताच प्रवेश रद्द करण्यासाठी घाई करत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यापासून कसे रोखावे, असा प्रश्न शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे उभा राहिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3083 mumbai fyjc college aspirants left without seats
First published on: 22-08-2017 at 03:43 IST