इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यानंतरही या मार्गावरून अद्याप ‘बेस्ट’ची सेवा सुरू झालेली नाही. बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असतानाही बेस्टने अद्याप नियोजन केलेले नसल्याने सर्वसामान्यांचा या मार्गावरील प्रवास महागडाच ठरत आहे.

case against contractor for mumbai goa highway poor quality work
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
Nashik, Change traffic route Nashik,
नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?
Ticket inspector beaten, Borivali Railway Police Station,
मुंबई : प्रवाशाकडून तिकीट तपासनीसला मारहाण, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mumbai coastal road project
मुंबई: सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला ३५ कोटींचा दंड, माहिती अधिकारातून बाब उघड

हेही वाचा >>> दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद; विभागप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरिन ड्राइव्ह दक्षिणवाहिनी मार्गिका १२ मार्चपासून खुली झाली. मार्गाचे काम सुरू होण्याच्या आधीपासून बस व रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते. मार्गावर अवजड वाहने, दुचाकी, तीन चाकी आणि पादचाऱ्यांना प्रवेश नसल्याने या मार्गावरून जायचे असल्यास केवळ स्वत:चे चारचाकी वाहन किंवा टॅक्सीचाच पर्याय आहे. बेस्टमुळे सर्वसामान्यांनाही तेथून प्रवास करणे शक्य झाले असते. मात्र सध्या या मार्गाचा थोडासाच भाग सुरू झाला असून संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर ‘बेस्ट’ बसमार्ग ठरवले जातील, असे बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर?

‘बेस्ट’कडे गाडयांचा अपुरा ताफा असल्यामुळे सागरी किनारा मार्गावरून सेवा सुरू होत नसल्याची चर्चा आहे. नवीन गाडयांसाठी कार्यादेश दिलेले असले तरी त्या गाडया येण्यास वेळ लागणार आहे.