मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यासाठी दाखल केलेला पहिला अर्ज फेटाळल्यानंतरही त्याच मागणीच्या त्यांच्या दुसऱ्या अर्जाला विरोध न करण्याच्या मुंबई महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेबद्दल उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. पालिकेने यापूर्वी हे बांधकाम बेकायदा ठरवून ते नियमित करण्यास नकार दिला होता. आम्हीही पालिकेचा निर्णय योग्य ठरवून हे बांधकाम बेकायदा ठरवले. असे असताना राणे यांच्या बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी केलेला अर्ज विचारात घेण्याचे पालिका कसे काय म्हणू शकते, न्यायालयापेक्षा पालिका सर्वोच्च आहे का, असा संतप्त प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी राणे यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने केलेला दुसरा अर्ज विचारात घेतला जाऊ शकतो आणि पालिका त्यावर वर्तमान कायदे- नियमांच्या तरतुदींनुसार विचार करेल, असे पालिकेतर्फे वकील अनिल साखरे यांनी न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाला मंगळवारी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court slam bmc for stance over narayan rane illegal construction zws
First published on: 24-08-2022 at 06:05 IST