सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून मुंबईला पाणीपुरवठा करणारे सहा जलाशय आणि उदंचन केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबईवरील दहशतवादी   हल्ल्यानंतर प्रशासनाने याबाबतची उपाययोजना करण्याची घोषणा केली होती. मात्र पालिका मुख्यालयासह इतर काही कार्यालयांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्यानंतर प्रशासन थंडावले होते. अखेर आता पालिकेने याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.