मुंबई : जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कुणीही बदलू शकत नाही. संविधान बदलण्याच्या चर्चा हाच बाबासाहेबांचा अपमान आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. दलित समाज विकसित भारताचा संकल्प ताकदीने पुढे घेऊन जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा दावाही आठवले यांनी पत्रकाद्वारे केला. 

आमचे मुक्तिदाते डॉ. आंबेडकर यांचा ज्या काँग्रेस पक्षाने वारंवार अपमान केला, एकदा नाही तर दोनदा निवडणुकीत पराभव केला, त्यांनीच संविधान बदलले जाण्याची चर्चा करणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मुळात अशा चर्चा करून दलित समाजाची फसवणूक आता करता येणार नाही. इतकी वर्षे राज्य करण्याची काँग्रेसची जी पद्धत होती, ती आता लागू पडणार नाही. आता आमचा समाज शिक्षित आहे, त्याचे सामाजिक भान जागृत झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांनी कितीही आरोप केले, तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही, असे आठवले म्हणाले. देशभरातील संपूर्ण दलित समाज ठामपणे मुख्य प्रवाहात येऊन विकसित भारताचे स्वप्न ताकदीने पुढे नेणाऱ्या मोदींबरोबर आहे, असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने कुणी काहीही प्रतिक्रिया दिल्या, तर त्यावर समाज कधीही विश्वास ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत तर ते अधिक मजबूत करीत आहेत. सरकारला संविधान बदलायचे असते, तर लोकसभेत दहा वर्षे संपूर्ण बहुमत आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
polish women poland uma devi
महात्मा गांधींनी ‘उमादेवी’ अशी ओळख दिलेल्या वांडा डायनोस्का कोण होत्या? पोलंडमधील या महिलेने भारतात आपली ओळख कशी निर्माण केली?
March in Pimpri-Chinchwad to protest the oppression of Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा
kolhapur, Ichalkaranji bandh, Hindu oppression, Bangladesh, anti-Hindu activities, protest,
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात इचलकरंजी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that the importance of independence was highlighted because of Bangladesh
बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
Manvel Pada, statue Dr Ambedkar,
वसई : पालिकेची ६ वर्षांपासून टोलवाटोलवी, मनवेल पाड्यात कार्यकर्त्यांनी उभारला डॉ. आंबेडकरांचा पुतळा
himanta Biswa Sarma
Assam : ‘खतं जिहाद’ अन् ‘जमीन जिहाद’नंतर आता आसामध्ये ‘पूर जिहाद’ होत असल्याचा आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप, नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा >>> ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’बाबत फेरविचार करा; ठाकरे गटाची  निवडणूक आयोगास विनंती

आठवले म्हणाले की, मोदींनी आज विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे, त्याचा सर्वाधिक फायदा दलित समाजाला होणार आहे. शेवटच्या माणसाची उन्नती झाल्याशिवाय भारत विकसित होऊच शकत नाही. त्यामुळे गरीब आणि वंचित हे या स्वप्नांचे सर्वात मोठे हकदार असतील. आजही सर्वांसाठी घरे, गॅस, वीज, पाणी यांचे लाभार्थी शेवटचे घटक आहेत. हाच संविधानाचा खरा अर्थ आहे, जोवर शेवटचा माणूस मुख्य प्रवाहात येत नाही, तोवर संविधानाचा संकल्प पूर्ण होणार नाही. तो पूर्ण व्हावा, म्हणूनच आम्ही मोदींबरोबर आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची ३,२०० कोटींची जागा मोदींनी तीन दिवसांत दिली. बाबासाहेबांचे लंडनमधील घर स्मारकात रूपांतरित केले. देवेंद्र फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठात बाबासाहेबांच्या पुतळयाचे अनावरण केले. आता तेथे नियमितपणे आंबेडकर जयंती साजरी होते. या कामांमुळे मोठया संख्येने आमचे बांधव मोदींच्या पाठीशी उभे असल्यानेच संविधान बदलण्याच्या चर्चा घडविल्या जात आहेत. – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री