भिवंडी तालुक्यातील काटई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात सोमवारी रात्री तुफान हाणामारी होऊन त्यात दहा कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिकडेच काटई ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यावरून ही हाणामारी झाली असून परस्परांविरूद्ध करण्यात आलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या २५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between ncp congress workers in bhivandi
First published on: 01-01-2013 at 05:20 IST