पाणीपुरवठा खंडित; पाणी उकळून प्यावे-पालिकेचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईत शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला बसला. पावसाचे पाणी साचल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. परिणामी, मुंबईतील बहुतांश भागांत रविवारी पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. शनिवारी रात्रीपासूनच पावसाच्या तांडवाने हवालदिल झालेल्या मुंबईकरांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने रविवारी नव्या समस्येला सामोरे जावे लागले. दरम्यान, युद्धपातळीवर संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करून संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in mumbai bhandup purification complex hit by incessant rains zws
First published on: 19-07-2021 at 03:22 IST